Friday 3 November 2017

What saurabh says Part #2



झी मराठी ह्या वाहिनीबद्दल मला व्यक्तीश: खूप आदर आहे.
आभाळमाया,वादळवाट, सारख्या दर्जेदार मालिका दिल्या.
सुरेल आणि अविट शिर्षकगीते दिली,
अल्फामहाकरंडक सारख्या स्पर्धा झाल्या,
'नक्षत्रांचे देणे'सारखा अनमोल ठेवा दिला,
सारेगमप च्या माध्यमातून नवे व्यासपीठ दिले,
झी गौरवच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना उर्जितावस्था दिली.

पण गेल्या काही दिवसात जसजशी इतर वाहिन्यांची स्पर्धा वाढत चालली आहे तसतशी झीचे सोशल इंजिनियरिंग वाढत चालले आहे.

अर्ध्याअधिक मालिकांची शीर्षके हिंदी-इंग्रजी झाली.
काहे दिया परदेस (अमराठी प्रेक्षक),
तुझ्यात जीव रंगला (पश्चिम महाराष्ट्र), माझ्या नवऱ्याची बायको (विदर्भ),
गाव गाता गजाली (कोकण),
असा आपला प्रेक्षकवर्ग वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत आहेत.
एक व्यावसायिक गरज म्हणून हे योग्यच आहे.
पण महाराष्ट्रात बहूसंख्य असलेला मराठा प्रेक्षकवर्ग लाभावा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचे अवास्तव चित्रण करणारी मालिका झी च्या नावलौकिकाला साजेशी नाही !!  स्टार प्रवाहवरची छत्रपती शिवरायांवरची मालिका सुद्धा ऐतिहासिक होती, पण तोफ उचलून लढाई लढणे किंवा 20 फूट उंच उडी मारून वार करणे, असा अतिरंजित पणा नव्हता.
झीची ही घसरण  पाहून वाईट वाटते !!

Credits : Saurabh Ratnaparakahi

No comments:

Post a Comment